PM किसान सन्मान निधीच्या 6000 ऐवजी आता शेतकऱ्यांना 10000 रुपये मिळणार, सरकारने घेतला मोठा निर्णय..

PM Kisan Nidhi 14th installment : भारतातील शेतकऱ्यांची स्थिती पाहिजे तशी चांगली नाही. यामुळेच येथे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात, जेणेकरून त्यांना मदत करता येईल. अशीच एक योजना आहे आणि ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजने अंतर्गत दरवर्षी 6000 रुपये शासनातर्फे शेतकऱ्यांना मिळतात. ही योजना संपूर्ण देशात लागू आहे. पण आता त्याच धर्तीवर आणखी एक योजना राज्य सरकारने सुरू केली असून, त्यानुसार आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांऐवजी 10,000 रुपये दिले जाणार आहेत.

काय आहे ही नवीन योजना
मध्य प्रदेश सरकारने ही नवीन योजना सुरू केली असून तिला किसान कल्याण योजना असे नाव दिले आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी 10 हजार रुपये देणार आहे. म्हणजे पीएम किसान सन्मान निधीतंर्गत प्रत्येक वर्षी मिळणारे 6000 रुपये तर नक्कीच मिळतील. मात्र यासोबतच शेतकऱ्यांना चार हजार रुपये देण्यात येणार आहेत. मध्यप्रदेश सरकारने 2020 मध्येच ही योजना सुरू केली होती. त्यावेळी हा पैसा दोन हप्त्यांमध्ये दोन हजाराच्या रूपाने जात असे.

कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल?
या योजनेचे लाभार्थी फक्त मध्य प्रदेशातील शेतकरीच आहे. त्यातल्या त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मध्यप्रदेशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसून, ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे. ही माहिती अशी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे आलेले नाहीत, त्यांच्या खात्यातही हे पैसे येणार नाहीत.

Similar Posts